Friday, February 18, 2011

आहार - सकाळ वृत्तसेवा

http://72.78.249.107/esakal/20100115/4991499793106867127.htm

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होत आहे. ते वाढविण्यासाठी आहार कसा असावा?
उत्तर : स्त्रीच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असतेच. स्त्रीच्या प्रकृतीला ते धरून आहे. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होतो. ते रक्त भरून काढण्यासाठी योग्य आहार घ्यायला हवा अन्यथा हिमोग्लोबिन कमी होते. हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्त्रीरोग वाढतात. मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा आधी येणे, गर्भाशयात गाठी होणे, अंगावर जाणे यांसारखे आजार होऊ शकतात आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण आणखी कमी होते. आहारात खजूर किंवा अंजीर असेल तर हिमोग्लोबिनला फायदा होतो.

हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण आहेत. त्यामुळे खजूर खायचा असेल तर तो तुपासह खायला हवा. बीट, पालक, मेथी याने लोह वाढते. पण शरीराने ते स्वीकारायला हवे. लोह व हिमोग्लोबिन यांचे सात्म्य करणे तेवढेसे सोपे नाही. सततच्या धावपळीमुळे शरीर जर गरम असेल तर अन्नातील हिमोग्लोबिन कमी ओढून घेते. म्हणून शरीरातील, विशेषतः मेंदूतील उष्णता अजिबात वाढता कामा नये. आपण अलीकडे तेलकट, मसाल्याचे तिखट पदार्थही भरपूर खातो, त्यानेही पोटातील उष्णता वाढते. प्रत्येक वस्तूला आपण फोडणी देतो, पोह्यांवर लिंबू पिळतो हे त्यातील धातूंचे शरीरात शोषण व्हावे म्हणून; पण आपण लिंबू पिळण्याऐवजी पोह्यावर दही घालून खातो. त्यामुळे त्याचा शरीराला काही फायदाच मिळत नाही; नुकसान मात्र होऊ शकते. म्हणून शरीरातील उष्णता न वाढवता हिमोग्लोबिन वाढवणारे शांतीरोझसारखे औषध आहारात रोज ठेवावे. पाळी नियमित राहावी यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शतावरी कल्प, च्यवनप्राशही आहारात असू द्यावे. केवळ आहाराने हिमोग्लोबिन वाढत नाही.

नाश्‍ता कधी घ्यावा? दुपारचे व रात्रीचे जेवण कोणत्या वेळी घ्यावे? प्रमाण कसे असावे? रात्री सूर्यप्रकाश नसतो त्याचा अन्नपदार्थांवर परिणाम होतो का?
उत्तर ः नाश्‍ता गरम असावा. दहीवडे, फळे हा नाश्‍ता होऊ शकत नाही. सूर्योदयापूर्वी उठणारा मनुष्य असेल तर सकाळी साडेआठच्या सुमारास नाश्‍ता घ्यावा. जेवढ्या लवकर भरपूर खाऊ तेवढी भूक टिकून राहते. सकाळी कामावर जाण्यापूर्वी दहा वाजता जेवण घेणाऱ्याला वेगळा नाश्‍ता करण्याची गरज नाही. सर्वसाधारण पाच-साडेपाचला वेळ बदलल्याने पित्त वाढते. म्हणून त्या वेळी काहीतरी तोंडात टाकणे आवश्‍यक आहे. म्हणजे पित्त वाढत नाही. नाश्‍ता गरम व भरपूर करावा. त्यापेक्षा जास्त दुपारचे जेवण असावे. रोज एखादे पक्वान्न असावे. दुपारच्या जेवणाच्या अर्ध्याहून कमी रात्रीचे जेवण असावे. मांसाहार रात्री करू नये. सूर्यास्तापूर्वी जेवण घेणे अधिक चांगले. अन्नपचन सोपे होते. अंधार पडल्यानंतर वातावरणातील बॅक्‍टेरियाही वाढतात, अन्नात विकृती येतात. त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतोच. म्हणून वातावरणातील अग्नी, उष्णता असेपर्यंत जेवण घ्यावे. सूर्यास्तापूर्वी जेवण घेणे सध्या शक्‍य होत नाही. पण सूर्य मावळल्यानंतरही पुढे काही वेळ उष्णता टिकून असते, तोवर जेवण घेता येईल. म्हणजे कार्ला येथे रात्री नऊपर्यंत किंवा पुण्या-मुंबईत रात्री अकरापर्यंत वातावरणातील उष्णता टिकून असते, तोवर तेथे जेवण घ्यायला हरकत नाही.

रोजच्या आहारात सॅलड किती असावे? तसेच फळे खाणे योग्य की फळांचा रस पिणे योग्य असते?
उत्तर ः आहार आठ भागांत विभागता येईल. म्हणजे दोन भाग भात, अर्धा भाग उसळ, अर्धा भाग अन्य भाजी, दीड भाग पोळी, अर्धा भाग आमटी, पक्वान्न दोन भाग असा सात भागांत आहार असेल. त्यानंतर अर्धा भाग सॅलड असावे. म्हणजे चार ते पाच टक्के एवढेच सॅलड खावे. कच्चे अन्न त्याहून अधिक नसावे. ते भरपूर खाल्ले तर त्यानेच पोट भरून जाईल, पण त्यामुळे शरीराची गरज भागणार नाही. पानांची सॅलड असतात त्यावर कोणतीही कीटकनाशक फवारणी केलेली नाही ना, त्याला उग्र वास येत नाही याची खातरजमा करून घ्यावी. काही गोष्टी उकडून, कोशिंबिरी करूनही खाता येतील. बटाटा उकडून त्यावर लोणी, मिरपूड टाकून त्याचे रायते करता येईल. अशा प्रकारे सॅलडमध्ये विविधताही ठेवता येईल.
फळे कापून खाण्याचा फायदा असतो. संत्री, मोसंबी, अननस, फणस अशी फळे वगळता बहुतेक फळे सालीसह खाता येतात. सफरचंदाचा सालासह रस काढला तर हरकत नाही. संत्री, मोसंबी यांचाही रस काढून प्यायला हरकत नाही. मात्र, फळे सकाळी दहानंतर सायंकाळी पाचपर्यंत खावीत. दुधाशी मिसळून कोणतेही फळ खाऊ नका. त्यामुळे मिल्कशेक वगैरे घेऊ नयेत. रात्रीच्या वेळी ज्यूस पिऊ नये. शिकरण खायला हरकत नाही. मात्र त्यात मध किंवा केशर घालून खावे. नुसते केळे दुधात कुस्करून केलेल्या शिकरणाने कफवृद्धी होते. शिकरणही दुपारच्या जेवणात घ्यावे; रात्री घेऊ नये.

रासायनिक खतावरच्या पालेभाज्यांचा शरीरावर दुष्परिणाम होतो का?
उत्तर : अगदीच रेल्वेलाईनच्या शेजारच्या, गटारीच्या पाण्यावर घेतलेल्या पालेभाज्या अजिबात खाऊ नयेत. आळू सांडपाण्यावर घेतला जातो; पण त्याचे पान दीड-दोन फूट उंच असते, तसेच त्यातील दोष काढून टाकण्यासाठी दही-ताक लावले जाते. पण पालक, मेथी या भाज्या जमिनीलगत असतात. त्यांच्याबाबत विशेष काळजी घ्यावी. शुद्ध व ताजी पालेभाजी असावी. जैनधर्मीयांत चातुर्मासात पालेभाज्या खात नाहीत. कारण त्या काळात जंतूसंसर्ग खूप होतो. पालेभाजी आधी मिठाच्या पाण्यात नीट धुवून घ्या. मग चांगल्या पाण्याने पुन्हा धुवून घ्या. त्यामुळे त्यावरील जंतू निघून जातील. भाजी थोडी हातावर कुस्करून वास घ्या. कीटकनाशके फवारलेली असतील व त्याचा अंश त्या पानांमध्ये असेल तर लगेच त्याचा वास येईल. ही भाजी खाण्यास अयोग्य असेल. कोबी, फ्लॉवरमध्ये खत व कीटकनाशके यांचा अंश टिकून राहतो. त्यावर अळ्याही लवकर पडतात. म्हणून या भाज्या शक्‍य तेवढ्या टाळाव्यात.

मेनोपॉजनंतर स्त्रीचा आहार कसा असावा?
उत्तर : रजोदर्शन हा स्त्रीच्या आरोग्याचा दाखला आहे. रजोनिवृत्तीनंतर तिच्यात मानसिक व शारीरिक बदल होतात. तिच्या पेशींना ताजंतवानं करणे, त्या पेशीतील दोष दूर करणे, मानसिक ताण बाहेर टाकणे ही कामे स्त्रीची हार्मोनल सिस्टिम करते. रजोनिवृत्तीनंतर तेच द्रव्य शरीरात साठायला लागतात. मग वजन वाढते, शरीर बेढब दिसू लागते, डोळे खोल जातात, चेहरा काळा दिसू लागतो. शरीरातील विषद्रव्ये, नको असलेली मानसिकता वाहून जाणे बंद झाल्याने हे सारे घडते. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर व्यायामाकडे लक्ष द्यावे. आहारात जड द्रव्ये घेऊ नयेत. तेलकट, तळकट पदार्थ, वाटाणा, राजमा, चवळी, वांगे असे वातुळ पदार्थ, मांसाहारात जुने व मोठ्या प्राण्यांचे मांस टाळायला हवे. तसेच शांत करणारे द्रव्य खावे. सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा गुलकंद, शांतीरोज, कुमारी कंपाउंड, अशोकारिष्ट अशी द्रव्ये घ्यावीत. शरीरातील कॅल्शिअम व हिमोग्लोबिन नीट राहील याकडे लक्ष ठेवावे.

नुकतीच बायपास झाली आहे. त्यानंतर शुगर आढळली. शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार कसा असावा? तूप खाऊ नये असे ऍलोपॅथी सांगते, तर आयुर्वेदात तूप खावे असे सांगितले जाते.
उत्तर : या विषयात आयुर्वेदाचे भरपूर संशोधन आहे. हजारो वर्षांचा अनुभव आहे. मी स्वतः पस्तीस वर्षे बृहत्‌वात चिंतामणी, श्‍वासचिंतामणी अशी औषधे देतो. रुग्णांना बरे करतो आहे. कच्च्या दुधावरचे क्रीम काढून तयार केलेले तूप किंवा रसायनांपासून केलेले तूप विकायला येते, ते खाऊ नये. आयुर्वेदिक पद्धतीने, पारंपरिक भारतीय पद्धतीने कढवलेले गाईच्या दुधापासूनचे साजूक तूप दिवसाला सात-आठ चमचे खावे. बायपासनंतर एकदम एवढे तूप खायला सुरवात करू नये. पहिल्यांदा दोन-तीन चमचे तूप खावे. महिन्याभराने त्यात वाढ करीत न्यावी. बायपासचा शॉक म्हणून रक्तात साखर उरते आहे. पण तरीही रोज चमचाभर उसाची पांढरी साखर खायला हवी. बत्ताशाची साखर पचायला अधिक सोपी असते. त्यामुळे दोन चमचे तुपात एक चमचा बत्ताशाची साखर घालून ती खाल्ली तर मधुमेह बरा व्हायला व हृदयाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल. आंबा, अतिप्रमाणात केळी, चिकू, सीताफळ, अल्कोहोल पूर्णतः वर्ज्य करावे. फ्लॉवर, कोबी, चवळी व वाटाणा हेही त्रासदायक ठरणार असल्याने खाऊ नयेत. संध्याकाळचे जेवण एकदम कमी करा. हलका फुलका, सूप खायला हरकत नाही. बायपासला सहा महिने झाल्यानंतर एकदा पंचकर्म करून घ्यावे म्हणजे पुन्हा रक्तवाहिनीत ब्लॉक होणार नाही. मधुमेहासाठी ते योग्य ठरेल.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
www.ayu.de

अकाल प्रसव - डॉ. श्री बालाजी तांबे

http://72.78.249.107/esakal/20110218/4633446810010384357.htm

संगीत हीच अभिव्यक्ती- अजय-अतुल (सकाळ वृत्तसेवा - Friday, February 18, 2011 AT 02:00 AM (IST))

http://72.78.249.107/esakal/20110218/5549021121388536455.htm

Tuesday, February 15, 2011

इजिप्त क्रांतीचा नवा नायक - वेल घोनिम (सकाळ वृत्तसेवा - Tuesday, February 15, 2011 AT 12:00 AM (IST) )


http://www.esakal.com/esakal/20110215/4654891311484336121.htm



'ज्यांची मुले या आंदोलनात मारली गेली, त्या प्रत्येक माता-पित्याची मी जड अंतःकरणाने माफी मागतो. मात्र ही आमची चूक नाही. जे सत्तेत ठाण मांडून बसले आहेत, तो प्रत्येक जण याला जबाबदार आहे. त्यांना सत्ता सोडावीशी वाटतच नाही.'' वेल घोनिम या तरुणाची दूरचित्रवाणीवाहिनीवरील ही मुलाखत ऐकताना सारा इजिप्त हेलावून गेला. कैरोच्या ताहरीर चौकात जमलेल्या लाखो निदर्शकांमध्ये लढ्यासाठी नवा जोम संचारला. कोण हा वेल घोनिम? तीस वर्षीय घोनिम हा या क्रांतीचा "नायक'च ठरला आहे.

1980 मध्ये इजिप्तमध्ये जन्मलेला घोनिम हा सध्या "गूगल' या सर्च इंजिनचा पश्‍चिम आशियाई देशांचा मार्केटिंगचा प्रमुख. तो लहानाचा मोठा झाला संयुक्त अरब अमिरातमध्ये. कैरो विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअर झाल्यानंतर अमेरिकी विद्यापीठातून त्याने एमबीए केले. त्यानंतर इजिप्त सरकारची वेबसाईटही त्यानेच डिझाईन केली. मुक्त जगाचा अनुभव घेतलेल्या; तसेच ट्विटर, फेसबुक वापरणाऱ्या तरुण पिढीचा प्रतिनिधी असलेल्या घोनिमला देशातील हुकूमशाही मनातून डाचतच होती. त्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी, उत्कृष्ट करिअरची संधी हातात असताना मायदेशात गुप्तपणे क्रांती घडविण्याचा मार्ग पत्करला. यासाठी त्याने दुबईतून कैरोत बदली मागून घेतली. 25 जानेवारीस त्याने फेसबुकवर "वुई आर ऑल खलीद सैद' हे पेज तयार केले. अलेक्‍झांड्रिया शहरात खलीद हा 28 वर्षीय तंत्रज्ञ पोलिस अत्याचाराचा बळी ठरला होता. फेसबुकवरील या पेजला साऱ्या अरब जगतातून अफाट प्रतिसाद मिळाला. रात्रंदिवस जागून घोनिम फेसबुकवर प्रतिक्रियांना प्रतिसाद देत होता. फारच थोड्या लोकांना ही बाब माहिती होती. 27 जानेवारीस त्याने "प्रे फॉर इजिप्त' असा मेसेज ट्‌विटरवर टाकला. त्याचा मेसेज वाचून हजारो तरुणांची पावले आपसूकच आंदोलनासाठी घराबाहेर पडत होती. त्याच दिवशी रात्री त्याला अटक झाली. 28 तारखेस ताहरीर चौकाकडे निघालेल्या निदर्शकांवर तुफान लाठीमार झाला. अश्रुधुराचा वापर करण्यात आला. घोनिमचे मित्र, पत्नी तसेच "गूगल'ने त्याच्या शोधासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. तब्बल आठवड्यानंतर विरोधी पक्षाचे नेते मुस्तफा अल्नागर यांनी घोनिम जिवंत असून, सरकारने त्याला अटक केल्याचा गौप्यस्फोट केला आणि साऱ्या देशात जनक्षोभ उसळला.

"ऍम्नेस्टी इंटरनॅशनल'ने त्याच्या सुटकेची मागणी केली. अखेर सरकारला त्याला सात फेब्रुवारीस तुरुंगातून सोडणे भाग पडले. तब्बल दहा दिवसांच्या कोठडीतून घोनिम बाहेर पडला तो इजिप्तचा नवा "हिरो' होऊनच. व्यक्ती, संघटना आणि पक्ष यांच्यापेक्षा देश मोठा, हे त्याने अत्यंत प्रभावीपणे आंदोलकांच्या मनावर बिंबवले... अन्‌ इजिप्तच्या नव्या पिढीला आपला नेता गवसला.

- धनंजय बिजले

आत्मविश्‍वास आणि संयम हीच यशाची गुरुकिल्ली - क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (सकाळ वृत्तसेवा - Tuesday, February 15, 2011 AT 12:30 AM (IST))

http://www.esakal.com/esakal/20110215/5202542726386417178.htm


पुणे - क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने सोमवारी "सकाळ'च्या शिवाजीनगर येथील कार्यालयास भेट देऊन संवाद साधला.

पुणे - 'आत्मविश्‍वास आणि संयम ही यशाची गुरुकिल्लीच आहे. मग, क्षेत्र क्रिकेटचे मैदान असो वा कॉर्पोरेट क्षेत्र. या दोन्ही गोष्टी बरोबर राहिल्या तर तुम्ही कारकिर्दीत यशाची "खेळपट्टी' निर्माण करू शकता...'' कसोटी मैदानावरील भारतीय संघाचा तारणहार व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने मांडलेले हे तत्त्वज्ञान.

एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने हा शैलादार फलंदाज सोमवारी पुण्यात आला होता. त्या वेळी त्याने "सकाळ कार्यालया'स भेट दिली, तेव्हा तो बोलत होता. लक्ष्मणची फलंदाजी जितकी प्रगल्भ तितकेच त्याचे विचारही प्रगल्भ असल्याची प्रचिती या वेळी आली. मैदानावर खेळताना कठीण परिस्थितीतही त्याची फलंदाजी इतकी सहज कशी होते, हे त्याच्या विचारावरून दिसून आले. प्रत्येक सामन्याप्रमाणे परिस्थितीनुसार खेळणारा आणि मैदानाबाहेर तेवढ्याच बारकाईने विचार करून बोलणारा लक्ष्मण आज बघायला मिळाला. एखादा छोटासा निर्णयही तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. तसेच खेळामध्येही आहे हे पटवून देताना त्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील आपल्या खेळीचे उदाहरण दिले. तो म्हणाला, ""दुसऱ्या कसोटी सामन्यात 4 बाद 60 अशा कठीण परिस्थितीत मी आणि चेतेश्‍वर पुजारा एकत्र आलो होतो. आम्ही फार काही वेगळे केले नाही. केवळ संयम राखून दिवस अखेरपर्यंतचा खेळ खेळून काढला. आमच्यात फार मोठी भागीदारी त्या वेळी झाली नाही; पण त्यामुळे लय सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खच्चीकरण मात्र नक्की झाले. ही छोटी भागीदारी आम्हाला आणि पुढे येणाऱ्या फलंदाजांना प्रेरक ठरली.''

आयुष्य आणि खेळ यांची सांगड घालूनच त्याने आपली मते मांडली. ""कारकिर्दीत प्रत्येक पायरीवर चढताना तुमचा स्वतःवर विश्‍वास असणे महत्त्वाचे असते. जेव्हा स्वतःच्या क्षमतेवर तुमचा विश्‍वास असतो, तेव्हाच तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर मात करू शकता. त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी सराव करताना खेळावर भर न देता मानसिकता कशी संतुलित राखता येईल, यावर भर देतो.''

क्रिकेटच्या मैदानावर खेळताना असण्याच्या दडपणाचा सामना करताना परिस्थिती समजून घेणे आवश्‍यक असल्याचे सांगून तो म्हणाला, ""खेळपट्टीवर थांबले की धावा होतात आणि तुमचे मनोधैर्य उंचावते, हा क्रिकेटचा मूलभूत मंत्र जरी लक्षात ठेवला, तरी तुमचे दडपण निम्म्याने कमी होते. फलंदाजीला उतरल्यावर संघाची परिस्थिती काय आहे, हे तुम्हाला माहीत असणे आवश्‍यक आहे. त्या वेळी सहकारी फलंदाजाला विश्‍वास देणे आवश्‍यक असते. दोघांमध्ये चांगला समन्वय राखल्यास प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात तुम्ही यशस्वी होता आणि त्याचा मोठा परिणाम सामन्यावर होतो.''

"आयपीएल' आणि "एमपीएल' या ट्‌वेंटी-20 स्पर्धांमुळे क्रिकेटची व्याप्ती वाढत असल्याचे मत लक्ष्मणने मांडले. तो म्हणाला, ""आयपीएलमुळे केवळ देशातीलच नाही, परदेशातील युवा खेळाडूंतही क्रिकेटचे आकर्षण वाढू लागले आहे. आतापर्यंत पालक क्रिकेटकडे वळण्यास काहीसे अनुत्सुक होते. मात्र, अशा प्रकारच्या वेगळ्या प्रयोगामुळे पालकही मुलाला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. असाच फायदा "एमपीएल'मुळे होत आहे. या स्पर्धेने महाराष्ट्रातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्याचा फायदा खेळाडूंना भविष्यात निश्‍चितच होईल.''

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेविषयी मात्र सावध प्रतिक्रिया देताना लक्ष्मण म्हणाला, ""कुणा एका संघाची संभाव्य विजेता म्हणून गणना करता येणार नाही. कारण, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. अर्थात, अलीकडच्या काळातील भारतीय संघाची कामगिरी लक्षात घेता आपल्याला विजेतेपदाची सर्वोत्तम संधी आहे.''

Friday, February 11, 2011

Are We for rules or Rules for us?

Many a times such situations occur in day to day life. The decision depends on the situation we are in at that moment and the effects of that decision on our lives, surroundings.

I came across two incidents, by which I have this question in mind. One of my senior told me the incident he knows, some days before. In one of the IT Company, there is a rule like – entry in the specific premise only with access card. Those who do not have access card cannot get entered. I think the place may be some client’s ODC and client wants such a way (I am not sure, and could not ask him so…). One day, some HOD or highly senior member came on Saturday (generally on non working day) with forgotten his access card. There were a glass door and a security person sat other side. He knocked many times but Security had not entertained him and not given any means of access to enter. Next day that senior member of organization, sent mail to all congratulating all for successful implementation of processes (rules).

Second incidence directly happened with me, last week. As per project need, one of my junior have to work as per US timings (7:00 pm to 3:00 am IST). As a process, he has to send me a status mail on end of his day.
That day there was an internet connectivity problem in office, by service provider (some downtime). Issue started something around 1:00 am and resolves at 5:00 am. He was waited till that and sent a status mail at 5:10 am. Next day (his next working day), I noticed the timing and asked him worriedly about too much work for him to handle? He told me the complete story and he was just waiting for internet connectivity from 1:00 am to 5:00 am, as he had completed his assigned work before only. That means, he was waiting for 3 hours (in deep midnight) only for sending a status mail (obeying the rule).
I was angry initially on him about his decision and asked him – “My dear friend, have you asked yourself sometimes – Are we for rules or Rules for us?” I concluded the discussion by saying –
1) I do not want donkeys in my team. (Of course he is not considering his capabilities and hard work.)
2) We made a rule/process for ease of operations and we have to stick for it.
3) But sometimes, somehow a situation occurs, such a way that, it is hard to follow rules, where we have to think differently. Like in first situation, consider the negative effect – If that senior member have some urgent meeting with client that highly affects on business and he missed it because of his mistake of forgetting access card and process. I blame process 90% in this situation. There should be some alternative to the process. And the alternative to second situation is –
a) Wait for half an hour or an hour till 1:30 to 2:00 am for internet connectivity and sending status mail, as there was no work as well. He had not his data card as well with him that day, by which he either send by using that (from home or from office).
b) If no connectivity – leave for the day.
c) In the next morning (or may be afternoon) when he wake up, directly call me and stating the status.
d) That’s it.
4) Finally - Rules for us and we are not for rules. Same the case for MONEY….

Thursday, February 10, 2011

5 ways to lower cholesterol

Read on...

http://in.news.yahoo.com/5-ways-lower-cholesterol-20110209-024332-544.html

सौष्ठव हरविलेली शहरी संस्कृती...By Maya Badnore, Solapur (Sakal Editorial - 10th Feb 2011)

जागतिकीकरणाच्या रेट्यात आर्थिक विकासदर झपाट्याने वाढविण्याच्या मागे जगातील सर्व राष्ट्रांची घोडदौड सुरू आहे. भौतिक विकास व आर्थिक सुबत्ता, विकासाचा दर उत्तरोत्तर वाढवून प्राप्त करता येते. भौतिक सुबत्ता प्राप्त झाली म्हणजे सर्वत्र आनंदीआनंद व सुख समाधान भरभरून वाट्याला येईल, अशी सर्वसामान्यांची कल्पना आहे. याचाच दुसरा अर्थ, भौतिक सोई देणाऱ्या वस्तू व सेवा आणि त्यांची प्राप्ती, हेच जीवनाचे ध्येय ठरले आहे. राहायला स्वतंत्र फ्लॅट, मुलांना कॉन्व्हेंटमधून शिक्षण, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वारेमाप खर्च, कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे मोबाईलची निकड, अप टू डेट माहितीसाठी घराघरात संगणकाची अत्यावश्‍यकता, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाहिजे ते चॅनेल पाहण्यासाठी एकाच वेळी किमान दोन टीव्ही सेट, फ्रिज, वॉशिंग मशिन अशा आवश्‍यक वस्तूंची रेलचेल अन्‌ दाटीवाटी दिसते. हे आजच्या शहरी संस्कृतीतील घराचे स्वरूप. कोणत्याही किरकोळ वस्तूसाठी शेजाऱ्यांवर अवलंबून न राहता, सारे कसे स्वतंत्र, स्वत:चेच. इतके सारे खर्चिक घटक सांभाळण्यासाठी कुटुंबातील स्त्रीला त्यामुळे नोकरीची अपरिहार्यता; कधी करिअर म्हणून, कधी प्राप्त केलेल्या उच्च शिक्षणाचा उपयोग म्हणून स्त्रीला- नोकरीनिमित्त बाहेर पडलेल्या स्त्रीला तिचे वेगळे क्षेत्र, स्वतंत्र विश्‍व, तिचे व्यक्तिमत्त्व जपण्यासाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष होणे अपरिहार्य. त्यातून निर्माण होणारे शारीरिक, मानसिक द्वंद. कुटुंबातील सदस्यांना पूर्ण वेळ देऊ न शकल्यामुळे परस्परांमध्ये निर्माण होणारा दुरावा, विसंवाद, कुटुंबातील तरुण मुलामुलींच्या निर्माण होणाऱ्या जीवनाविषयक समस्या निस्तरताना होणारे खच्चीकरण, असे चित्र सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबात दिसते. कुटुंबातील सदस्य एकाच घरात पेईंग गेस्टप्रमाणे राहतात. स्वतंत्र वृत्तीचे, स्वतंत्र विचारसरणीचे कुटुंबातील सदस्य घर नावाच्या एका छताखाली वावरतात इतकेच खरे. अशा कौटुंबिक वातावरणातील तरुण मुले-मुली मग आपले आनंदाचे क्षण, हॉटेलमध्ये पार्टी देऊन साजरे करतात. आजकाल या पार्ट्यांचे स्वरूपही संशयास्पद बनत आहे.
हातात खळखळ खेळणाऱ्या पैशाने शहरी संस्कृतीला चंगळवादी, भोगवादी बनविले आहे. माणूस मानसिक व अतिरिक्त श्रमांमुळे शारीरिक स्वास्थ्य गमावून बसला आहे. बाहेरून दिसणारा शहरी झगमगाट माणसाला आतून पोखरत चालला आहे. शहरात दिसणारे मोठमोठे मॉल्स, त्यांची संस्कृती, हा शहरी संस्कृतीचा झगमगाट ही सूज आहे; सौष्ठव नाही. कारण या विकासाच्या अवस्थेत माणूस माणूस न राहता बिनचेहऱ्याचा केवळ हाडांमांसाचा गोळा शिल्लक राहिलाय. त्याच्यातील संवेदनशीलता नष्ट झालेल्या आहेत.

Hasan Mushrif - A great healthcare work for poors. गोरगरिबांच्या डॉक्‍टराचा गौरव व्हावा

संपूर्ण राज्यातील सर्वसामान्य आणि गरिबातील गरीब लोकांच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करून नवा आदर्श लोकांसमोर ठेवणारे, हजारो गरीब रुग्णांना महाग वैद्यकीय सेवेचा लाभ मोफत मिळवून देणारे कामगार कल्याणमंत्री हसन मुश्रीफ यांचा देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते गौरव होऊन त्यांच्या कार्याची उचित पावती दिली जावी, अशी भावना लाखो गोरगरीब रुग्णांमध्ये आहे. अब्जावधी रुपयांच्या या शस्त्रक्रिया पंचतारांकित आणि सप्ततारांकित दवाखान्यामध्ये करायला लावून लाखो लोकांना मुश्रीफांनी जीवदान दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजारांहून अधिक तर कागल तालुक्‍यातील सहा हजारांहून अधिक रुग्णांना याचा लाभ झाला. कुणाला आई, कुणाचे वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या शस्त्रक्रिया मोफत झाल्यामुळे मदत मिळाली. या कामाबाबत श्री. मुश्रीफांशी बोलताना त्यांनी सांगितले, ""शरद पवारांनी आपल्यावर विधी आणि न्याय खात्याचा कारभार सोपविला आणि त्यातून आपण हे करू शकलो.''


महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्‍ट 41 अ अन्वये नोंदणी झालेले 347 दवाखाने आहेत. या दवाखान्यांनी 10 टक्के लोकांवर मोफत औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करावयाची असा कायदा आहे; मात्र तसे होत नव्हते. मुंबई हॉस्पिटल, ब्रीच कॅंडी, लिलावती, हिरानंदानी, जसलोक, भाटिया, पुणे रुबी, जहॉंगीर, मंगेशकर तसेच औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि शिर्डी येथील अनेक महागड्या दवाखान्यांचा यामध्ये समावेश आहे.


या दवाखान्यांमध्ये यापूर्वी गरिबांवर उपचार झाले नव्हते. श्री. मुश्रीफांनी कायद्याची कठोर अंमलबजावणीचा धाक दाखवून गोरगरिबांवर मोफत शस्त्रक्रिया
करायला लावल्या. आपल्या आयुष्यातील हे सर्वोत्कृष्ट काम असल्याचे श्री. मुश्रीफ सांगतात. अपंग, विधवा, परित्यक्‍त्या, निराधार लोकांना मिळणारी पेन्शन दुप्पट करण्याचे काम, महिला बचत गटाला केले जाणारे सहाय्य, सार्वजनिक कामाचा डोंगर आणि तरुणाईला काम देण्यासाठी कागलला आणलेली पंचतारांकित एमआयडीसी अशा कामांत सतत अग्रेसर राहून पक्षवाढीसाठी अहोरात्र झटणाऱ्या श्री. मुश्रीफांचा सत्कार व्हावा आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे सर्वसामान्यांना वाटते.